Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

झर्ये या अति दुर्गम गावातील दिप्तीची MBBS साठी निवड... कोणतेही महागडे क्लास न लावता मोबाईल नेटद्वारे केला अभ्यास. नेटसाठी दररोज 5 किलोमीटर अंतरावर करावी लागली पायपीट.

लांजा, रत्नागिरी:- प्रतिकुल परिस्थितीत स्वयंम अभ्यास करून मोबाईल नेट साठी 5 किलोमीटर अंतरावर दररोज पायपीट करून झर्ये या अति दुर्गम गावातील आणि कोंडगे श्री रामेश्वर विद्यालयची माजी विद्यार्थिनी दिप्ती दशरथ विश्वासराव (झर्ये) हिने नीट (मेडिकल) परीक्षेत विशेष यश संपादन करून एम, बी, बी, एस (डॉक्टर) साठी अकोला येथील शासकीय महाविद्यालयात प्रवेशकर्ती झाली आहे.


दिप्ती हिचे निर्भेळ यश ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. कोणतेही महागडे खाजगी क्लास ने घेता केवळ मोबाइल नेटवर्किंग वर जिद्द, मेहनत यावर नीट चे शिवधनुष्य पेलवले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द, संयम व प्रयत्नांची पराकाष्टा करीत दीप्ती ने चक्क एकाच वर्षी स्वतः कष्ट करून परीक्षेत घवघवीत यश मिळविले आणि झर्ये या ग्रामीण भागातील मुलगी प्रथमच डॉक्टर होणार आहे हा आनंद साऱ्या गांवकरी यांना आहे. तिने आपल्या आईवडीलांच्या कष्टांचे चीज करीत त्यांना आपल्या दैदिप्यमान यशाची भेट दिली!

  लांजा तालुक्यातील सह्याद्री च्या पायथ्याशी असलेले कुरंग गावा शेजारी झर्ये गाव. राजापूर तालुक्यात हे गाव मोडते. अजूनही या गावात मोबाइल नेटवर्क नाही. मूलभूत सुविधा पासून हे गाव वंचित आहे. दिप्ती ही कोंडगे रामेश्वर विध्यालयात शिकत असताना तिची नवोदय विद्यालय राजापूर येथे निवड झाली. त्या ठिकाणी दहावी त 95 टक्के गुण मिळवून प्रथम आली होती. बारावीला पुन्हा सिबीएससी बोर्डाच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळवले होते. नीट परीक्षा साठी पुर्व तयारी नसताना तिला पहिल्या प्रयत्नात 350 गुण मिळाले. मात्र निराश न होता पुन्हा नीट ची तयारी करण्यासाठी सज्ज झाली. झर्ये गावात मोबाइल नेट नसल्याने ती सकाळी 5 किलोमीटर चालत येऊन ज्या ठिकाणी रेंज मिळेल त्या ठिकाणी ऑनलाईन नीट परीक्षेचा अभ्यास करत होती. पुन्हा कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन झाल्याने ती लांजा त नातेवाईक यांच्या कडे मोबाइल नेट मिळावे म्हणून राहिली. 
Also Read This 

दिप्तीचे वडील हे एका पतसंस्थेत कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी असलेल्या दांपत्याला एकूण दोन मुले.

     दिप्तीने खडतर अभ्यास करुन बारावीला ९२ टक्के गुण मिळविले आणि नीट मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 575/750 गुण मिळवून यश संपादन केले. या गुणांमुळे तिला अकोला येथील शासकीय कॉलेजला प्रवेश मिळाला आहे.नीट परीक्षेसाठी ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक नव्हते. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात काय करावे हे सुचत नव्हते. शेवटी व्यवस्थित माहिती मिळवून अभ्यासाला सुरुवात केली.

    दिप्ती सांगते की "आपल्या मध्ये ही टॅलेंट असते, नियमित सराव, अभ्यास केला पाहिजे. एनसिआर्टी (NCERT) पुस्तके यांचा अभ्यास केला पाहिजे. जीवनात संकटांना सामोरे जात आपण आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यासाठी संयम आणि प्रार्थनेचीही आवश्यकता असते. आव्हाने आणि संकटे आपल्याला शक्तिशाली आणि सहनशील बनवतात आणि आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी तयार करतात.’

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिप्तीचा संदेश

Watch This

स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी दिप्ती सांगते, आपली स्वप्ने आणि ध्येये जिवंत ठेवा. सतत आशावादी तसेच वास्तववादी रहा.  आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रवासात अनेक संकटे येतील. ती तुमची परीक्षा घेतील. परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न पुर्ण कराल, त्यावेळी त्या यशापुढे तुमचे कष्ट, भोगलेले दुःख काहीच वाटणार नाही.
Tag
माझ्या प्रेरणादायी पोस्ट

Post a Comment

0 Comments

close