म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, या मागणीासाठी राज्यातील शिक्षकांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी शहरातून पुन्हा शिक्षकांचा एक जथ्था आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न १८ वर्षांपासून आहे. तत्कालिन आघाडी सरकारने कायम शब्द काढला, मात्र अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. युती सरकारच्या काळातही हा प्रश्न प्रलंबितच आहे. एक व दोन जुलै २०१६ रोजी पात्र शाळांची यादी काढत २० टक्के अनुदानाची घोषणा केली, मात्र दोन वर्षांनंतरही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या प्रश्नावर शिक्षकांनी विभागीय पातळीवर आंदोलने केली. त्यानंतर विधीमंडळावर आंदोलन सुरू आहे. त्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातील शिक्षक आल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. सोमवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासह शिक्षणमंत्र्यांनी विधीमंडळात आश्वासन दिल्याने सोमवारी मुख्यमंत्री या प्रश्नावर बैठक घेण्याची शक्यता आहे. त्या बैठकीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट
0 Comments