सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकार हे काव्यसंग्रह लिहिले. याच काव्यसंग्रहातील एक गाजलेली कविता - तयास मानव म्हणावे का?
सावित्रीबाई फुले यांची कविता - तयास मानव म्हणावे का?
धर्मनिरपेक्षतेची मूल्य रुजविणारी राजमाता जिजाऊ - Click Here
सावित्रीबाई फुले निबंध, भाषण, पहा. - Click Here
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का? १
दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही त
यास मानव म्हणावे का? २
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का? ३
जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियानांतर्गत राबवायचे उपक्रम पहा - Click Here
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का? ४
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का? ५
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का? ६
बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का? ७
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का? ८
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता - सावित्री निघाली बघा, अहो शाळेत शिकवायला ...
Image download
0 Comments