Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासोबत करणेबाबत

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाहय विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे. याबाबतचे शासन परिपत्रक डाउनलोड करा. 

केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शासन निर्णय दि.१४.१०.२०२२ अन्वये राज्यामध्ये सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत उल्लास "नव भारत साक्षरता कार्यक्रम" या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि. २५.१.२०२३ अन्वये सदर योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली दि.१८.०४.२०२३ रोजी संपन्न झालेल्या राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये केंद्र/राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे कामकाज पूर्ण करणेबाबत निर्देशित केलेले आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याकरीता ६ लक्ष २० हजार तसेच सन २०२३-२४ या वर्षाकरिता ६ लक्ष २० हजार एवढे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. संदर्भ क्र. ५ नुसार दोन्ही वर्षातील एकूण १२ लक्ष ४० हजार एवढे उद्दिष्ट सन २०२४- २५ करिता कायम ठेवण्यात आलेले आहे. त्या उद्दिष्टापैकी अद्यापपर्यंत ६,७०,३७५ इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास अॅपवर झालेली असून ५.६९.६२५ इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने असाक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखलपात्र विद्यार्थी शोध मोहिम तसेच शाळाचाहय विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षरांचे व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. दि. 02-05-2024 नुसार या संचालनालयस्तरावरुन नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये सर्वेक्षणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी राज्यात दिनांक ०५/०७/२०२४ ते २०/०७/२०२४ पर्यंत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण मोहिम राबविणेबाबत पत्र निर्गमित केलेले आहे. तरी या सर्वेक्षणासोबतच उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

त्याअनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये असाक्षर व्यक्ती व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करुन असाक्षर व्यक्तींची उल्लास ॲपवर नोंदणी व स्वयंसेवकासोबत टैगिंग करण्याबाबत सूचना द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.


असाक्षरांच्या सर्वेक्षणासाठीची प्रपत्रे PDF -  1 ते 6 नमूना डाउनलोड करा. Click Here


असाक्षरांचे सर्वेक्षण शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासोबत करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


Previous Update

शासन परिपत्रक 28 ऑगस्ट 2023 - नुसार नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत सूचना


नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थामार्फत करण्यात येणार असल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, असे कोणत्याही प्रकारचे आदेश या कार्यालयस्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाहय विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे, याची नोंद घ्यावी. हे सर्वेक्षण शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत शिक्षकांनी करावयाचे आहे ही बाब कटाक्षाने पाळली जाईल याकडे लक्ष द्यावे.


नवभारत साक्षरता अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करणेबाबत शासन परिपत्रक दि. 28/08/2023 डाउनलोड करा. - Click Here





नवभारत साक्षरता सर्वेक्षणाबाबत शासन परिपत्रक दि. 21/08/2023 अपडेट

जनगणना २०११ मधील उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयास गावनिहाय निरक्षरांची आकडेवारी प्राप्त झालेली आहे परंतु गावनिहाय निरक्षरांचे नावे अप्राप्त आहे. त्यामुळे अशा निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील १५ वर्ष व त्यावरील वयोगटातील साधारणपणे १ कोटी ६३ लक्ष इतकी आहेत. सदर निरक्षर व्यक्तींना मार्च सन २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा स्वयंसेवी पध्दतीने ऑनलाईन नोंदणीव्दारे सर्वेक्षणासाठी व अध्ययन-अध्यापनासाठी सहभाग घेण्यात येत आहे. तरी सदर योजनेच्या माध्यमातून निरक्षर व्यक्तींच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी राज्यातील शिक्षकांचे सर्वेक्षणासाठी सहकार्य अपेक्षित आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील निरक्षरता पूर्णपणे संपुष्टात आणणे शक्य होईल. असे आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी विजय कोंबे यांच्या निवेदनावर केले आहे. 

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण शिक्षकांऐवजी स्वयंसेवी संस्थेकडून करणेबाबत शासन परिपत्रक दि. 21/08/2023 डाउनलोड करा. Click Here



शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलेल्या आवाहनास शिक्षक समितीचा विरोधच, नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यावर शिक्षकांचा बहिष्कार कायम




नवभारत साक्षरता कार्यक्रम बहिष्कार कायमच...

आम्ही *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* सुरूवातीपासून *बहिष्कार* वर ठाम आहोत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्या कुणी दिल्यात..? या कपोलकल्पित बातम्यांना प्रसिद्धी कुणी दिली. *_महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती_* म्हणून आम्ही राज्य शाखेने अधिकृतपणे कुठेही शिक्षकांकडून सर्वेक्षणाचे काम काढून घेतल्याची एकही बातमी किंवा कुठेही पोस्ट टाकली नाही कारण यात कोणतीही सत्यता नाही हे आम्ही स्पष्ट केले होते.
   अनेक बांधवांच्या पोस्ट आल्या किंवा फोन आले त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगूनही अनेक लोकं बातम्या शेअर करत गेले..  न झालेल्या निर्णयाचे स्वागत करत गेले हीच चळवळीची शोकांतिका आहे.
    आज तर एका संघटनेने मा. शिक्षण मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचा हवाला देऊन काम शिक्षकांकडून काढून घेतले अशी पोस्ट देत मा. मंत्री महोदयांचे आभारही मानले आहे.
   *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* म्हणून सर्वेक्षण *_बहिष्कारावर आम्ही ठाम आहोत._* संचालनालयाने आज २८ ऑगस्ट रोजी काढलेले पत्र म्हणजे संघटनेचे अपयश नसून अशैक्षणिक कामे तसेच शिक्षकांना त्रस्त करण्याच्या मुजोरीचा भाग आहे. 
   शिक्षक बांधवांना अशा जाचातून खरोखरच मुक्ती हवी असल्यास बहिष्कार आणि विरोधाची भूमिका कायम ठेवावी लागेल. 
   शासन-प्रशासन व्यवस्थेकडून कोणतीही मागणी सहज व विनासायास मान्य होईल ही भूमिकाच मुळात स्वप्नरंजन आहे.  
    विजय कोंबे
    राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती





Post a Comment

0 Comments

close