Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्नेहभोजन - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये आता स्नेहभोजन उपक्रम

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत वाढ व कुपोषण मुक्तता करण्यासाठी राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत दरमहा स्नेहभोजन उपक्रम राबविणेबाबत संचालक यांनी निर्देश दिले आहेत. 


शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत स्नेहभोजन आयोजित करणेबाबत...

केंद्रशासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दि. २२ ते २८ जुलै, २०२४ या दरम्यान "शिक्षण सप्ताह" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तुत उपक्रमांतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवार, दि. २८ जुलै, २०२४ रोजी "Community Involvement Day (Including Tithi bhojan, Vidyanjali etc." समुदाय सहभाग दिवस (तिथी भोजन, विद्यांजली इ.) इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


वरील प्रमाणे नमूद उपक्रमांतर्गत "समुदास सहभाग दिवस" या दिवशी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रम राबविला जाईल याकरीता सर्व शाळांना प्रोत्साहीत करण्यात यावे तसेच सर्व शाळांमधून तिथी भोजन (स्नेहभोजन) उपक्रमाची अंमलबजावणी होईल याकरीता क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक नियोजन करण्यात यावे.

केंद्रशासनाने निर्धारित केलेनुसार "तिथी भोजन (स्नेहभोजन)" उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याकरीता सूचना / शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here



पोषण आहार योजनेंतर्गत नवीन पाककृती बाबत शासन परिपत्रक - Click Here

पोषण आहार योजनेंतर्गत दर आठवड्याला पूरक आहार देणेबाबत परिपत्रक पहा - Click Here


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. योजनेत वैविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या "१०० दिवसांच्या कार्यक्रमाचा" एक भाग म्हणून स्नेह भोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. नियमित मध्यान्ह भोजना व्यतिरिक्त स्नेहभोजन उपक्रमामुळे लोकसहभाग वाढणार आहे. 


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रमाचे फायदे

स्नेहभोजन उपक्रमातून लोकसहभाग वाढल्याने शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, 

विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल. 

विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील. 

आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, 

विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्न पदार्थाची चव चाखता येईल, 

तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. 


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत "स्नेहभोजन" उपक्रम राबविण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत.

१. नवीन शैक्षणिक वर्षातील पुढील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये किमान एक दिवस शाळेमध्ये स्नेह भोजन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी.

२. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी "स्नेहभोजन" हा उपक्रम राबविण्यात यावा, सदर उपक्रम "ऐच्छिक" स्वरूपाचा राहील.

३. शाळास्तरावर "स्नेहभोजन" उपक्रमाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.

 I) गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्म शताब्दी इ. तसेच, लग्न समारंभ, धार्मीक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इ. बाबी या उपक्रमातंर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील.

ii) योजनेस पात्र सर्व शाळामधून " स्नेहभोजन" उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस राहतील, त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक सभेद्वारा जनजागृती करण्यात यावी, तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनाही सदर प्रक्रियेबाबत अवगत करुन त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घ्यावे.

iii) शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे) फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन्न) इत्यादीचा समावेश असलेले अन्न आहार विद्याथ्यांना देण्यात यावा.

iv) "स्नेहभोजन" उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तिनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.

v) "स्नेहभोजन" उपक्रमाअंतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्य पदार्थ किंवा आवश्यक इतर साहित्य (पाणी पिण्याचे पिंप, पाण्याचे ग्लास, ताटे, चमचे, डिश, मुलांना बसण्यासाठी चटई अथवा सतरंजी, पाण्याची टाकी, पाणी शुध्दीकरण यंत्र इ.) देता येतील,

vi) खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ गहू/नाचणी, शेवगा शेंग/डाळी सोबत हिरव्या पालेभाज्या दिल्या जाव्यात. बाजारातील वेष्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.

vii) खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने स्नेहभोजन दिवशी शाळेत उपस्थित रहावे.

viii) खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तसेच, मध्यान्ह भोजनाच्या वेळेतच देण्यात यावेत.

ix) यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजविण्यात येवू नये. तथापि, केवळ अल्पोपहार / पूरक आहार दिल्यास त्या दिवशी शाळेमध्ये शालेय पोषण आहार देणे आवश्यक राहील.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये  दरमहा स्नेहभोजन उपक्रम राबविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा - Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2024 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close