*▪कॅल्शिअम कशात असतं?*
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
*कमतरतेमुळे काय होतं?*
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
*कार्य काय असतं?*
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
*▪लोह कशात असतं?*
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
*कमतरतेमुळे काय होतं?*
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
*कार्य काय असतं?*
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
*▪सोडिअम कशात असतं?*
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
*कमतरतेमुळे काय होतं?*
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
*कार्य काय असतं?*
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
*▪आयोडिन कशात असतं?*
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
*कमतरतेमुळे काय होतं?*
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
*कार्य काय असतं?*
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
*▪पोटॅशिअम कशात असतं?*
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
*कमतरतेमुळे काय होतं?*
अॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
*कार्य काय असतं?*
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
*▪फॉस्फरस कशात असतं?*
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
*कमतरतेमुळे काय होतं?*
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
*कार्य काय असतं?*
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
*▪सिलिकॉन कशात असतं?*
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
*कमतरतेमुळे काय होतं?*
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
*कार्य काय असतं?*
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
*▪मॅग्नेशिअम कशात असतं?*
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
*कमतरतेमुळे काय होतं?*
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
*कार्य काय असतं?*
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
*▪सल्फर कशात असतं?*
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
*कमतरतेमुळे काय होतं?*
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
*कार्य काय असतं?*
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
*▪क्लोरिन कशात असतं?*
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
*कमतरतेमुळे काय होतं?*
अॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अॅलर्जी.
*कार्य काय असतं?*
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
*🔸खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔸*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रोत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
*वेळीच जागे व्हा आणि निरोगी जीवन जगा ..*
योग्य आहार घ्या ! लठ्ठपणा हटवा !
◼◼◼◼◼◼◼◼◼◼


0 Comments