- डॉ. शशांक शहा, बॅरिअॅट्रिक सर्जन
भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, सध्या भारतात मधुमेहींचे वाढते प्रमाण चिंताग्रस्त करणारे आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अत्यंत जवळचा संबंध असून त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही समस्या परस्परावलंबी आहेत. या दोन्ही समस्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक वेळा एकत्रच आढळतात.
लठ्ठपणा कसा ओळखावा?
लठ्ठपणाचे वर्गीकरण करण्यासाठी ‘बीएमआय’ अर्थातच ‘बॉडी मास इंडेक्स’चा वापर केला जातो. ते वजन आणि उंचीचे गुणोत्तर असते. बीएमआयचे गुणोत्तर १८:२५ असेल, तर हे प्रकरण ‘नॉर्मल’ आहे. बीएमआय गुणोत्तर २५:३० असेल, तर जास्त वजन, ३०:३५ असेल तर ती व्यक्ती लठ्ठपणाच्या पहिल्या पायरीवर असते. हे गुणोत्तर ३५:४०च्या पुढे असेल तर ती लठ्ठपणाच्या दुसऱ्या पायरीवर असते आणि ४० आणि त्यापुढे असेल तर गंभीर स्वरूपाचा लठ्ठपणा आहे, हे समजून घ्यावे. कमरेचा घेर स्त्रियांमध्ये ८० सेंटीमीटरपेक्षा आणि पुरुषांमध्ये ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांना निमंत्रण असते. जसजसा बीएमआय किंवा कमरेचा घेर वाढत जातो, तशा शरीरात अनेक व्याधी निर्माण होतात. सर्वसाधारणपणे लठ्ठपणाचा आजार हा आनुवांशिक स्वरूपातही दिसून येतो.
आनुवंशिकता आणि लठ्ठपणा
पालकांपैकी एकजण लठ्ठ असेल, तर मुलांमध्ये लठ्ठपणाची शक्यता तीस टक्के असते. आई-वडिलांना दोघांनाही लठ्ठपणा असेल तर ही शक्यता चाळीस टक्के होते. त्यासोबत मधुमेह असेल तर हे प्रमाण दुप्पट होते. त्याबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे, की दर पुढच्या पिढीमध्ये हे आजार लहान वयात अधिक येतात. कुटुंबातल्या खाण्यापिण्याच्या सवयींचे लठ्ठपणातले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची चयापचयाची क्रिया जितकी कमकुवत असेल, तितकी ती व्यक्ती या आजारांना बळी पडते.
आजारांना आमंत्रण
स्थूलता किंवा ओबेसिटी हा एक मोठा आजार आहे, ज्यामुळे इतर अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. परंतु, दुर्दैवाने कोणीही याला आजार समजत नाही. हा आजार अती खाण्याने व व्यायाम न करण्याने होतो, हे अंशतः खरे आहे; पण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त स्थूल व्यक्तींना या दोन्ही गोष्टी करूनही वजन कमी करता येत नाही व झाल्यास ते पुन्हा वाढते. शरीरातील संप्रेरके (हार्मोन्स) आणि गुणसूत्रे (जीन्स) याला कारणीभूत असतात. अशा रुग्णांना वैद्यकीय उपचारांची गरज असते. त्यामध्ये आहार, व्यायामासोबतच औषधे दिली जातात. पण त्यानेही १० ते १५ टक्के रुग्णांनाच फरक पडतो. स्थूलता कमी करण्यासाठी सर्वांत प्रभावी वैद्यकीय उपाय म्हणजे बॅरिअॅट्रिक सर्जरी. स्थूलतेमुळे मधुमेह, अतिरक्तदाब, गुडघेदुखी, सांधेदुखी, अर्धांगवायू, कॅन्सर असे अनेक आजार विशेषतः हृदयविकार हे कमी वयात व मोठ्या प्रमाणात होतात. या आजारांना ‘मेटाबोलिक सिंड्रोम’ असे म्हणतात. स्थूलता निर्माण व्हायला अनेक हार्मोन्स कारणीभूत असतात व यातले बहुतेक सर्व पचनसंस्थेत तयार होतात. उदा. इन्शुलिन, घ्रेलिन इ. त्यामुळे पचनसंस्थेच्या रचनेत बदल केल्यास स्थूलता कमी होते व त्याबरोबरचे आजारही नाहीसे होतात, असे दिसून आले आहे.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments