०१/०९/२०२२ ते १५/०९/२०२२ या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक / कर्मचारी तसेच पालक यांनी स्वच्छता पखवाडा हा कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या पाणी व स्वच्छता विभाग या विभागाकडून कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या स्वच्छता पखवाडा कृती आराखड्यानुसार स्वच्छता पखवाडा हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करावयाची आहे.
स्वच्छता पखवाडा मध्ये तीन प्रमुख गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे - १) हात धुणे, २) मास्क लावणे आणि ३) सुरक्षित अंतर. या तीन गोष्टींचा उपयोग करुन शाळा / कॉलेज मध्ये दिलेल्या कालावधीमध्ये स्वच्छता पखवाडा साजरा करणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ चे नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वच्छता पखवाडा साजरा करावा.
दि. ०१/०९/२०२२ ते १५/०९/२०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येकाच्या घरी स्वच्छता पखवाडा साजरा होण्याच्या दृष्टीने कृती आराखड्यानुसार आखणी करुन त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करण्यात आले आहे.
0 Comments