Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील विद्यापीठांमध्ये होणार ६५९ पदांची भरती

१५ अकृषी व अभिमत विद्यापीठांना लाभ
- 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पाठपुराव्याला यश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या १५ अकृषी विद्यापीठे व शासनमान्य विद्यापीठांमधील एकूण मंजूर पदांपैकी ८० टक्के शिक्षकीय (शिक्षक व समकक्ष शिक्षक) पदभरतीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे १५ अकृषी विद्यापीठांतील ६५९ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील १५ अकृषी व अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक पदांचा आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू असून, त्यास अधिक कालावधी लागू शकतो. या दरम्यान अस्तित्वात असलेली अनेक शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थी व एकूणच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यामुळे यासंदर्भात विद्यापीठे, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटनांकडून रिक्त पदे भरण्याबाबत वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला जात होता. 'महाराष्ट्र टाइम्स'नेही या विषय सातत्याने लावून धरला होता. सहा महिन्यांत शिक्षकांची सर्व पदे भरण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाकडे राज्य सरकारच्या होत असलेल्या दुर्लक्षाबाबतचे वृत्त 'मटा'ने २७ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या पदभरतीबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून विद्यापीठांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठांमधील भरतीवर बंदी आणण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. हे टाळण्यासाठी ही भरती तातडीने व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू होते. विद्यापीठाचे शैक्षणिक हित विचारात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने विभागाच्या अंतर्गत ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता देण्याची शिफारस केल्यामुळे अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठांमधील रिक्त शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर आता भरती करण्यात येणार आहे. (सहा महिन्यांत प्रक्रिया...५)
विद्यापीठ मंजूर पदे
मुंबई विद्यापीठ - १३६
एसएनडीटी विद्यापीठ - ७८

Post a Comment

0 Comments

close