१ मे महाराष्ट्र स्थापना दिन | महाराष्ट्र राज्य निर्मिती इतिहास | १०६ हुतात्मा माहिती व नावे | १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
अशी झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र नव्हते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्यामुळे भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरु लागली. गुजराती भाषिकांनी स्वतःचे वेगळे राज्य हवे होते, तर, मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
१०६ हुतात्म्यांच्या आंदोलनाची गोष्ट व हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर १९५६ रोजी तत्कालीन बॉम्बेमधील (आत्ताची मुंबई) जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून मोठमोठ्याने घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता.
राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदर कडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले.
लाठीचार्ज करुनही आंदोलन दडपण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य निर्मिती प्रसंगी शहीद झालेल्या हुतात्म्यांची नावे
१) सिताराम बनाजी पवार
२) जोसेफ डेव्हिड पेजारकर
३) चिमणलाल डी शेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५) रामचंद्र सेवाराम
६) शंकर खोटे
७) धर्माजी गंगाराम नागवेकर
८) रामचंद्र लक्ष्मण जाधव
९) के जे झेवियर
१०) पी एस जॉन
११) शरद जी वाणी
१२) वेदीसिंग
१३) रामचंद्र भाटीया
१४) गंगाराम गुणाजी
१५) गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६) निवृत्ती विठोबा मोरे
१७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८) बालप्पा मुतण्णा कामाठी
१९) धोंडू लक्ष्मण पारडूले
२०) भाऊ सखाराम कदम
२१) यशवंत बाबाजी भगत
२२) गोविंद बाबूराव जोगल
२३) पांडूरंग धोंडू धाडवे
२४ ) गोपाळ चिमाजी कोरडे
२५) पांडूरंग बाबाजी जाधव
२६) बाबू हरी दाते
२७) अनुप माहावीर
२८) विनायक पांचाळ
२९) सिताराम गणपत म्हादे
३०) सुभाष भिवा बोरकर
३१) गणपत रामा तानकर
३२) सिताराम गयादीन
३३) गोरखनाथ रावजी जगताप
३४) महमद अली
३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६) देवाजी सखाराम पाटील
३७) शामलाल जेठानंद
३८) सदाशिव महादेव भोसले
३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१) भिकाजी बाबू बांबरकर
४२) सखाराम श्रीपत ढमाले
४३) नरेंद्र नारायण प्रधान
४४) शंकर गोपाल कुष्टे
४५) दत्ताराम कृष्णा सावंत
४६) बबन बापू भरगुडे
४७) विष्णू सखाराम बने
४८) सिताराम धोंडू राडये
४९) तुकाराम धोंडू शिंदे
५०) विठ्ठल गंगाराम मोरे
५१) रामा लखन विंदा
५२) एडवीन आमब्रोझ साळवी
५३) बाबा महादू सावंत
५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५) विठ्ठल दौलत साळुंखे
५६) रामनाथ पांडूरंग अमृते
५७) परशुराम अंबाजी देसाई
५८) घनश्याम बाबू कोलार
५९) धोंडू रामकृष्ण सुतार
६०) मुनीमजी बलदेव पांडे
६१) मारुती विठोबा म्हस्के
६२) भाऊ कोंडीबा भास्कर
६३) धोंडो राघो पुजारी
६४) ह्रुदयसिंग दारजेसिंग
६५) पांडू माहादू अवरीरकर
६६) शंकर विठोबा राणे
६७) विजयकुमार सदाशिव भडेकर
६८) कृष्णाजी गणू शिंदे
६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०) धोंडू भागू जाधव
७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३) करपैया किरमल देवेंद्र
७४) चुलाराम मुंबराज
७५) बालमोहन
७६) अनंता
७७) गंगाराम विष्णू गुरव
७८) रत्नु गोंदिवरे
७९) सय्यद कासम
८०) भिकाजी दाजी
८१) अनंत गोलतकर
८२) किसन वीरकर
८३) सुखलाल रामलाल बंसकर
८४) पांडूरंग विष्णू वाळके
८५) फुलवरी मगरु
८६) गुलाब कृष्णा खवळे
८७) बाबूराव देवदास पाटील
८८) लक्ष्मण नरहरी थोरात
८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०) गणपत रामा भुते
९१) मुनशी वझीऱअली
९२) दौलतराम मथुरादास
९३) विठ्ठल नारायण चव्हाण
९४) देवजी शिवन राठोड
९५) रावजीभाई डोसाभाई पटेल
९६) होरमसजी करसेटजी
९७) गिरधर हेमचंद लोहार
९८) सत्तू खंडू वाईकर
९९) गणपत श्रीधर जोशी
१००) माधव राजाराम तुरे (बेलदार)
१०१) मारुती बेन्नाळकर
१०२) मधूकर बापू बांदेकर
१०३) लक्ष्मण गोविंद गावडे
१०४) महादेव बारीगडी
१०५) कमलाबाई मोहित
१०६) सीताराम दुलाजी घाडीगावकर
0 Comments