अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील जैतादेही गावात राबविण्यात आला आहे. जैतादेही पॅटर्न च्या धरतीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यातील शाळा व अंगणवाड्यांचा भौतिक विकास करणे शक्य आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असते आवश्यक असते. स्वच्छ, सुंदर व हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे आणि शिकविणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी होते. अशा परिसरात दिवसभर मन प्रसन्न राहील तसेच मुले शाळेकडे पर्यायाने शिक्षणाकडे आकर्षित होतील. अशाप्रकारे शाळांचा विकास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनविणे शक्य आहे. याबाबतचा सुंदर प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील जैतादेही गावात राबविण्यात आला आहे. जैतादेही पॅटर्न च्या धरतीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्य आहे.
शाळा व अंगणवाड्यांच्या विकासासाठी मनरेगा अंतर्गत करता येणारी कामे.
१) शाळेसाठी किचन शेड
२) इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना
३) शाळा व अंगणवाडी परिसरात शोषखड्डा
४) शाळा व अंगणवाडीसाठी multi-unit शौचालय
५) खेळाचे मैदान
६) संरक्षक भिंत
७) वृक्ष लागवड
८) शाळा व अंगणवाडी परिसरात पेव्हर ब्लॉक
९) गटार / नाली बांधकाम
१०) शाळा व अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे.
११) गांडूळ खत निर्मिती प्रकल्प
१२) परसबाग / शालेय बाग
१३) शालेय आवार साफ सफाई
१४) कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प
१५) शाळा व अंगणवाडी छत दुरुस्ती
या प्रकल्पाचे फायदे
वरीलप्रमाणे आवश्यक कामे मनरेगा योजनेच्या माध्यमातून करुन घेतली तर पुढील फायदे होतील.
१) राज्यातील शाळा व अंगणवाड्यांचा भौतिक विकास होवून परिसर स्वच्छ, सुंदर होण्यास मदत होईल.
२) शाळा व अंगणवाड्यांच्या परिसरात वृक्षलागवड केल्यास परिसर हिरवागार व प्रसन्न राहतो.
३) फळांची झाडे व भाजीपाला लागवड केल्यामुळे मुलांचा पोषण स्तर सुधारण्यास मदत होते.
४) गांडूळ खत / कंपोस्ट खत तयार केल्याने तयार होणारे सेंद्रिय खत शाळा व अंगणवाड्यांच्या परिसरातील झाडांना व परसबागेला घालता येईल.
५) रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचनेमुळे जलस्तर वाढण्यास मदत होते.
६) खेळाचे मैदान व्यवस्थित केल्यास शारीरिक इजा कमी होतात.
हे ही वाचा.
0 Comments