भारत सरकारने ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme) सुरु केला आहे.
शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शालेय आरोग्य कार्यक्रमाची व्याख्या "मुले आणि शालेय कर्मचार्यांच्या आरोग्याचे जतन आणि वृद्धी करण्यासाठी तसेच आरोग्य सेवा आरोग्यदायी जीवन आणि आरोग्य शिक्षण यासाठी शालेय उपाय" अशी केली जाते.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये निरोगी वर्तन आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या टाळण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शाळेत जाणारी मुले बहुतांश वेळ वेळेत घालवतात त्यामुळे शाळेतील अधिकारी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निरोगी वर्तन विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.
आपल्या राज्यामध्ये आयुषमान भारत उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम औरंगाबाद, बीड, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळांमध्ये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या you tube channel वरुन दिले जाणार आहे.
शालेय आरोग्य कार्यक्रम - दिवस चौथा ( 26 मार्च )
Live 10.30am 👇
शालेय आरोग्य कार्यक्रम - दिवस तिसरा ( 25 मार्च )
शालेय आरोग्य कार्यक्रम - दुसरा दिवस ( 24 मार्च )
शालेय आरोग्य कार्यक्रम - पहिला दिवस ( 23 मार्च )
0 Comments